महामार्गावर उडणारी धूळ प्रवाशांसह वाहनचालकांसाठी धोकादायक ठरत आहे...
देवरी,दि.03 ;
नागपुर - रायपुर महामार्गावर खड्डयांबरोबर आता धुळीचे साम्राज्य पसरले असून देवरी ते शिरपुर/बांध परिसरात वाहन चालकांना आता धुळीचा सामना करावा लागत आहे. महामार्गावर ठिकठिकाणी खड्याचे साम्राज्य दिसून येत आहे. निकृष्ट दर्जाच्या महामार्ग बांधनीमुळे महाार्गावर खड्यानीं आपले साम्राज्य स्तापीत केले आहे. त्यातच संबधीत विभागा कडुन खड्डे विझविन्यात न धूळ रोखण्यास पुरेशी उपाययोजना केली जात नसल्याने प्रवाशांना व वाहन चालकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ज्यामुळे श्वसनाचे आजार वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
संबंधित विभागाच्या निष्काळजीमुळे नागपुर - रायपुर महामार्गावरील देवरी ते शिरपुर/बांध महामार्गाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. खड्यांमधून बाहेर आलेले दगड ट्रकच्या चाकातून उडून प्रवासी, दुचाकीस्वारांच्या डोळ्यांना, डोक्याला जबर मार बसून नाहक जीव जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. संबंधित यंत्रणेने खड्यांच्या आणि धुळीचा होणारा त्रास कमी करण्यासाठी लवकरात लवकर चांगल्या कायमच्या उपाययोजना कराव्यात अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
0 टिप्पण्या