Hot Posts

6/recent/ticker-posts

जिल्ह्यातील १०४ आदिवासी गावांचा होणार प्रधानमंत्री जनजातीय उन्नत ग्राम अभियानात समावेश

 


आदिवासी गावाचा होणार कायापालट...

देवरी, दि.23 ; 

       केंद्रीय मंत्रिमंडळाने प्रधान मंत्री जनजातीय उन्नत ग्राम अभियानास मंजुरी प्रदान केलेली असून दुर्गम व अतिदुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासी बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रधानमंत्री जनजातीय उन्नत ग्राम अभियानाला केंद्र सरकारने हिरवा कंदील दाखविला आहे.त्यामुळे देशातील ६३ हजार तर महाराष्ट्रातील ३२ जिल्हयातील ४ हजार ९३७ आदिवासी गावाचा कायापालट होणार आहे. यामध्ये गोंदिया जिल्ह्यातील ८ तालुक्यातील १०४ आदिवासी गावाचा समावेश असून आदिवासी बांधवांचे सामाजिक आणि आर्थिक सक्षमीकरण केले जाणार आहे.या अभियानासाठी आवश्यक निधी केंद्र व राज्य सरकारकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

 केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सन २०२४-२५च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात जनजातीय उन्नत ग्राम अभियानाची घोषणा केली होती बुधवार १८ सप्टेंबर ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेट बैठकीत या अभियानाला मंजुरी देण्यात आलेली आहे या अभियानाचा शुभारंभ ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे पीएम- जनमन अभियानात १७ सलग्न असलेल्या मंत्रालयाद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध २५ उपक्रमाचा समावेश असणार आहे त्याद्वारे सामाजिक पायाभूत सुविधा आरोग्य, शिक्षण, अजिविका यामधील तफावत भरून काढण्याचा प्रयत्न असणार आहे तसेच आदिवासी क्षेत्र आणि समुदायाच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासावर भर दिला जाणार आहे.

जिल्ह्यांना मिळणार पुरस्कार :- प्रधानमंत्री जनजातीय उन्नत ग्राम अभियानात सहभागी प्रत्येक मंत्रालयावर पुढील ५ पाच वर्षात निश्चित उद्दिष्टे साध्य करण्यासाठी अनुसूचित जमातीच्या विकास कृती आराखडा तयार करून उपलब्ध निधीद्वारे त्यांच्याशी संबंधित योजना कालबद्ध पद्धतीने कार्य निमित्त करण्याची जबाबदारी असणार आहे दरम्यान या अभियानांतर्गत समाविष्ट असलेली आदिवासी गावे पीएम गतिशक्ती पोर्टलवर संबंधित विभागाद्वारे त्यांच्या योजनेतून मॅप केल्या जातील पोर्टलचे भौतिक आर्थिक प्रगतीचे परीक्षण केले जाईल सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यांना पुरस्कार देण्यात येणार आहे पुढील महिन्यात या अभियानाला शुभारंभ होणार आहे.

"दुर्गम व अति दुर्गम भागात राहणारे आदिवासी बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रधानमंत्री जनजातीय उन्नत ग्राम अभियानाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे यात गोंदिया जिल्ह्यातील ८ तालुक्यातील १०४ आदिवासी गावांचा समावेश आहे पीएएम -जनमन अभियानात १७ मंत्रालयाद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध २५ उपक्रमाचा समावेश असणार आहे " प्राप्त निधीमधून आदिवासी क्षेत्र आणि समुदायाच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासावर भर दिला जाणार आहे यात आदिवासी समाजाचे सामाजिक आणि आर्थिक सक्षमीकरण केले जाणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या